जळगाव घटनेवर बाळासाहेब थोरात यांची तीव्र प्रतिक्रिया: दोषींवर कारवाईची मागणी
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Sep 16, 2024
- 1 min read
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जळगाव येथे घडलेल्या राऊत दांपत्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, चुकीची कामे करण्यासाठी मंत्रालयाकडून येणाऱ्या दबावामुळे अधिकारी बळी पडत आहेत.
थोरात यांनी स्पष्टपणे विचारले की, "मंत्रालयातून नेमके कोण आदेश देत होते? कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव होता?" या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
थोरात यांनी असेही म्हटले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊन ते राबविण्यासाठी जे दबावतंत्र सुरू आहे, त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली आहे.



